सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली – केंद्र आणि राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी आली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही महागाई भत्तावाढ जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे. त्याचा फायदा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.
वाचा :-नव्या कोरोना स्ट्रेनला भारतात रोखण्यात आले यश
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे आता त्यांचा एकूण महागाई भत्ता २८ टक्के झाला आहे. यापूर्वी गेल्या जानेवारीत ४ टक्के आणि गेल्या जुलैमध्ये ३ टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. आता तो आणखी ४ टक्क्यांनी वाढल्यामुळे या कर्मचाऱ्यांना वर्षभरात ११ टक्क्यांची घसघशीत महागाई भत्तावाढ मिळाली आहे. या वाढीव महागाई भत्त्यातचा फायदा केंद्र सरकारच्या सुमारे ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. याशिवाय ६० लाखांहून अधिक निवृत्ती कर्मचाऱ्यांना आणि राज्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरवर्षी २ वेळा वाढ केली जाते. त्याच्या आर्थिक खर्चाचा बोजा सरकारी तिजोरीवर पडतो.