breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबाद शहराच्या नामांतराला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोध

मुंबई – शिवसेनेपाठोपाठ मनसे आणि भाजपनेही ‘औरंगाबाद’ शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा आग्रह धरला असतानाच भाजपच्या मित्रपक्षाचा मात्र विरोधाचा सूर आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे.

वाचा :-नाचता येईना अंगण वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे; औरंगाबाद संभाजीनगर नामकरण वाद पेटला

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की , औरंगाबाद शहराचे औरंगाबाद हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ते नाव बदलण्याचा जे कोणी मागणी करत आहेत त्याला आमचा विरोध आहे. रामदास आठवले असेही म्हणाले की, आमची राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी औरंगाबाद हे नाव बदलण्याचा प्रयत्न करू नये. हे नाव बदलू नये अशी आमच्या पक्षाची मागणी आहे.

वाचा :-‘त्यांच्या तल्लख बुद्धीचातुर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच’, शिवसेनेचं प्रत्युत्तर


दरम्यान, आठवले शेतकरी आंदोलनाबाबत म्हणाले की, मोदी सरकारने आणलेले तीन नवे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. ते रद्द करण्याचा काही शेतकऱ्यांचा प्रयत्न चुकीचा आहे. त्यांनी या कायद्यात बदल सुचवावा पण ते कायदेच रद्द करण्याची मागणी योग्य नसल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button