राज्यात 3 हजार 940 नवे कोरोना रुग्ण
- 3 हजार 119 रुग्णांना डिस्चार्ज
मुंबई – राज्यात गेल्या 24 तासात 3 हजार 940 रुग्णांची वाढ झाली असून 74 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३,११९ कोोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने आणि आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, “राज्यात आज ३,९४० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३,११९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १७,८१,८४१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६१,०९५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.१४ टक्के झाले आहे.
दरम्यान, राज्यात दिवसभरात ७४ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा मृत्यूदर २.५७ टक्के झाला आहे. आजपर्यंत १,२०,५९,२३५ नमुन्यांपैकी १८,९२,७०७ (१५.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच सध्या ५,००,३६० रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. तर ४,०२० लोक इन्स्टिट्युशनर क्वारंटाइन आहेत.