येरवड्यात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त
पुणे | प्रतिनिधी
येरवडा परिसरात दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना वाढत आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकही संताप व्यक्त करत आहेत. तसेचं कमी दाबाने वीजपुरवठा होण्याच्या घटनेत देखील वाढ झाल्याचे चित्र आहे.
येरवडा परिसरातील नागपूर चाळ पहिली गल्लीमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. शुक्रवारी (दि. १८) आणि शनिवारी (दि. 19) दोन दिवस नागरिकांना खंडीत वीजपुरवठाचा सामना करावा लागत आहे. तसेच कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे वीज यंत्रणा खराब होत आहेत. तसेच सुमारे २० मिनिटे वीज पुरवठाच खंडित होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तांत्रिक बिघाड निर्माण होत असल्याने या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. या बाबत नागरिक वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. मात्र संपर्क झाला नाही. तांत्रिक बिघाड असेल तर तो त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.