सुयश टिळकने बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; खाली पिली चित्रपटात साकारतोय एका गुंडाची भुमिका
झी मराठीची गाजलेली मालिका ‘का रे दुरावा’ मधून अत्यंत साध्या सोज्वळ अशा मुलाची भुमिका साकारणारा जय अर्थातच सुयश टिळकने बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमात चक्क एका गुंंडाच्या रुपात दिसुन येणार आहे, ईशान खट्टर आणि अनन्या पांंडे यांचे मुख्य पात्र असलेल्या खाली पिली या सिनेमातून सुयश बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. अलिकडेच त्याने आपल्या इंंस्टाग्राम अकाउंट वरुन आपले काही चित्रिकरणाच्या वेळचे फोटो शेअर केले होते. त्यात सुयशला हा राऊडी लूक सुट होतोय हे दिसून येत. सुयशने या चित्रपटाविषयी तसेच आपल्या भुमिकेविषयी माहिती देताना आपण मन्या नावाच्या गुंंडाची भुमिका साकारत असल्याचे सांंगितले होते. तसेच पहिला सिनेमा आहे मात्र लॉकडाउनमुळे त्याचे प्रदर्शन मोठ्या पडद्यावर होणार नाही याची खंंत असल्याचंही त्याने बोलून दाखवलं.
सुयशने सांंगितल्यानुसार तो कुठल्या तरी मालिकेत काम करत असताना चित्रपटाच्या टीम मधील एकाने त्याला पाहिले होते, लूक आवडल्याने त्यांनी सुयशला ऑडिशनसाठी बोलावलं. तीन ऑडिशन्स आणि लूक टेस्ट दिल्यानंतर त्याच्या वाट्याला ही भुमिका आली, यात सर्वात मोठा टास्क होता भाषेचा. पहिलाच चित्रपट असल्याने हिंंदीचा लहेजा शिकुन सांंभाळण्यासाठी मेहनत घ्यावी लागली असेही सुयश म्हणतो. भविष्यात मालिका, सिनेमांंसोबतच वेबसीरीज मध्येही आपले नशीब आजमवण्याचा सुयशचा विचार आहे.
खाली पिली सिनेमात ईशान खट्टर आणि अनन्या एकत्र दिसुन येणार आहेत या दोघांंचेही सुयश ने भरपुर कौतुक केलेय. ईशान चे तर अभिनयावर प्रचंड प्रेम आहे शिवाय अनन्या अत्यंंत सिंंपल आहे तिचा कुठलाही टॅंट्रम नसायचा असे सुयश सांंगतो. दरम्यान सुयश सध्या मराठी सिनेसृष्टीत सुद्धा चर्चेत आहे,. त्याची नवी मालिका शुभमंंगल ऑनलाईन प्रेक्षकांंच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. यात तो सायली संजीव सोबत पहिल्यांंदाच काम करताना पाहायला मिळणार आहे, सुबोध भावे या मालिकेचा निर्माता आहे