breaking-newsराष्ट्रिय
रामदेव बाबांना दिलासा, पतंजलीचा फूड पार्क प्रकल्प उत्तर प्रदेशातच होणार
लखनऊ : पतंजलीने आपला सहा हजार कोटींचा फूड पार्क उत्तर प्रदेशाबाहेर नेण्याची घोणषा करताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना फूड पार्कचं काम वेगवान गतीने करण्याचा आदेश दिला आहे. पतंजलीने फूड पार्क प्रोजेक्टसाठी राज्य सरकारकडून योग्य ती मदत मिळत नसल्याचा आरोप करत प्रोजेक्ट राज्याबाहेर नेण्याचं जाहीर केलं होतं.
दरम्यान, “मुख्यमंत्र्यांनी आचार्य बाळकृष्ण यांच्याशी चर्चा केली असून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. अद्याप प्रोजेक्ट रद्द करण्यात आलेला नाही. त्यांना जमीन देण्यात आली असून लवकरच प्रोजेक्ट सुरु होईल”, अशी माहिती मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पतंजलीच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबतही चर्चा केली असून सर्व औपचारिकता लवकर पूर्ण केल्या जातील असं आश्वासन दिलं आहे.