खळबळजनक! नवऱ्याची चार लग्न, दुसऱ्या पत्नीकडून हत्या, मुंबईत चौघे गजाआड
मुंबई: सतत बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीच्या कुटुंबियांनी हत्या करण्यात आलेली आहे. मोहम्मद सुलेमान अब्दुल शेख (40) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी चार आरोपींना अटक केलेली आहे. मोहम्मद सुलेमान अब्दुल शेख याची हत्या एका पत्नीचा भाऊ आणि कुटुंबियांनी केली आहे. मोहम्मद शेख यांनी चार लग्न केलेले होते. त्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या पत्नीच्या चारित्र्यावर तो सतत संशय घेत होता. त्याच्या पत्नीचे तिच्या सख्ख्या भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन वारंवार त्रास देत असायचा व सतत तिला मारहाण करायचा.
हा राग मनात धरुन पत्नीचा भाऊ रामेश्वर, सोमेश्वर चौधरी, बंडू चौधरी, लक्ष्मण उर्फ पोपट चौधरी यांनी चौघांनी त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या डोक्यात दगडी पाटा घालून त्याची हत्या केली. मोहम्मद सुलेमान हा रे रोडच्या ब्रिक बंदर परिसरातील रहिवासी होता. तो व्यवसायाने गाड़ी चालवत होता. त्यासोबतच त्याचे दुकान आणि इतर अनेक धंदे देखील होते. दरम्यान या हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी दोन तासात चौघांना अटक केलेली आहे. यानंतर त्यांना भोईवाडा न्यायलयात हजर केले असता, त्यांना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणी संशयाव्यतिरिक्त इतर काही कारण आहे का याबाबतचा तपास सुरु आहे.