#Breaking News | पालघरचा संपूर्ण तपास CBI कडे, त्यांची नावे जाहीर – गृहमंत्री देशमुख
मुंबई | पालघर प्रकरणी १०१ जणांना अटक करण्यात आली आहे. पालघरचा संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून घटना झाल्यानंतर ८ तासांतच १०१ जणांना अटक केली. त्या १०१ जणांची यादी आज जाहीर करत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पालघरमधील घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी असल्याचं म्हटले आहे.हल्लेखोर मंडळी जंगलातून पळून जाण्याचा आणि लपण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पोलिसांनी या सगळ्यांना पकडले आहे.
पकडण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एकही मुस्लिम समाजाचा कोणीही नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री देशमुख यांनी दिले. असे असताना सुद्धा या घटनेला धार्मिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न झाला, ही बाब अंत्यत गंभीर आणि दुर्दैवी आहे. आ ज संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र, यातही काहीजण राजकारण करत आहेत. हे चुकीचे आहे. सगळ्यांनी कोरोनाशी सामना केला पाहिजे, असे ते म्हणालेत.