पराभवानंतर भारताच्या महिला संघाचे शरद पवारांनी केले कौतुक…
टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव केला…या पराभवानंतर नक्कीच नाराजीच वातवरण पहायला मिळत आहे…मात्र पराभवानंतर भारताच्या महिला संघाचे शरद पवारांनी कौतुक केलं आहे…महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामाना करावा लागला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ८५ धावांनी पराभूत केले. पण या पराभवानंतरही आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी महिला संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. भारतीय संघाचे भवितव्य उज्वल आहे, अशा शुभेच्छाही पवार यांनी भारतीय महिला संघाला दिल्या आहेत.
भारतीय संघ महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीती पोहोचला, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण या विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. पण अंतिम फेरीत मात्र ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली.