Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
सत्ता स्थापन करणार नसाल तर भाजपाचा मुख्यमंत्री कसा होईल? -संजय राऊत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/02/raut-1.jpg)
मुंबई : भाजपाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तास्थापन करणार नसल्याचे सांगितले. याबाबतची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. यावर शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
भाजपा गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असे सांगत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे राजीनामा देतानाही पुढील जे सरकार बनेल ते भाजपाचेच असणार असा दावा केला होता. तसेच भाजपाचे नेतेही भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत होते. आजच्या माघारीवरून राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.