TOP Newsताज्या घडामोडीपुणे

६० साखर कारखान्यांची धुराडी अद्याप बंदच

पुणे : राज्यातील उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरीही अद्याप १३८ कारखानेच सुरू झाले आहेत. अजून सुमारे साठ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणे बाकी आहे. मागील हंगामात दोनशे कारखाने सुरू होते. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ६८ सहकारी आणि ७० खासगी, असे एकूण १३८ कारखाने सुरू झाले आहेत. मागील वर्षांत याच वेळी राज्यात १५० कारखाने सुरू होते.  यंदा कोल्हापूर विभागात ३२, पुणे विभागात २४,  सोलापूर विभागात ३७, अहमदनगर विभागात १५, औरंगाबाद विभागात ११, नांदेड विभागात १६,  अमरावती विभागात दोन तर नागपूर विभागात केवळ एकच कारखाना सुरू झाला आहे.

मागील हंगामात वर्धा, भंडारामध्ये प्रत्येकी एक आणि यवतमाळ आणि नागपुरात प्रत्येकी दोन, असे एकूण सहा कारखाने सुरू होते. पण, यंदा आजअखेर अमरावती विभागात दोन आणि नागपूर विभागात एक, असे तीन कारखाने सुरू झाले आहेत. मागील हंगामात सर्वात कमी साखर उत्पादन करणाऱ्या दहा कारखान्यांमध्ये विदर्भातील चार कारखान्यांचा समावेश होता. त्यात नागपूरमधील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, युनिट एक बेला (ता. उमरेड), आणि व्यंकटेश्वरा (मौदा), वर्धामधील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, युनिट तीन,  भंडाऱ्यातील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, युनिट- चार या चार साखर कारखान्यांचा समावेश आहे.

विदर्भातील जमीन-पाणी ऊस उत्पादनासाठी पोषक आहे. मात्र, दुर्दैवाने तेथील राजकीय नेत्यांनी साखर उद्योगाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. चांगले नेतृत्व न मिळाल्यामुळेच विदर्भात साखर उद्योगाचा विकास होऊ शकला नाही. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील सुधाकरराव नाईक कारखाना आम्ही चांगला चालवून दाखविला आहे. 

– बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर, मिल्स असोसिएशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button