‘जन नायकन’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; आतापर्यंत 10 चित्रपटांना टाकलं मागे, किती कोटी कमावले?

Jana Nayagan Box Office Day 1: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांच्या अखेरच्या चित्रपटाची चाहत्यांना असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. ‘जन नायकन’ हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करताना दिसत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत चित्रपटाने 13.33 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून अनेक चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा विक्रम मोडला आहे.
पहिल्याच दिवशी जोरदार कमाई
वेबसाइट Sacnilk च्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, ‘जन नायकन’ने दुपारी 2 वाजेपर्यंत भारतात 13.33 कोटी रुपयांची नेट, तर 15.73 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. देशभरात चित्रपटाचे 5,477 शो सुरू असून प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद असल्याचे दिसत आहे.
ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म BookMyShow वरही चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी 2 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. दुपारी 1 ते 2 या एका तासातच तब्बल 30,480 तिकिटे विकली गेल्याची नोंद आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रासाठी ‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी
या 10 चित्रपटांना टाकले मागे
पहिल्या दिवसाच्या कमाईत ‘जन नायकन’ने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. त्यामध्ये:
Haunted 3D – ₹2.50 कोटी
राजा शिवाजी – ₹11.35 कोटी
Alpha – ₹9.25 कोटी
है जवानी तो इश्क होना है – ₹8.65 कोटी
ओ रोमियो – ₹9.01 कोटी
मर्दानी 3 – ₹4 कोटी
चांद मेरा दिल – ₹3.31 कोटी
पति पत्नी और वो 2 – ₹4.38 कोटी
इक्कीस – ₹7.28 कोटी
मैं वापस आऊंगा – ₹1.15 कोटी
अजूनही काही चित्रपट पुढे
मात्र, पहिल्या दिवसाच्या कमाईत ‘जन नायकन’ अजूनही काही मोठ्या चित्रपटांच्या मागे आहे. त्यामध्ये:
द ओडिसी – ₹17.40 कोटी
वेलकम टू द जंगल – ₹15.25 कोटी
धमाल 4 – ₹14 कोटी
चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, पहिल्या दिवसाअखेर 20 कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संध्याकाळच्या आणि रात्रीच्या शोमध्येही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
‘जन नायकन’चे दिग्दर्शन एच. विनोथ यांनी केले आहे. चित्रपटात थलपती विजय, पूजा हेगडे, बॉबी देओल आणि ममिथा बैजू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट विजय यांच्या अभिनय कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट मानला जात आहे. अभिनयातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला असून सध्या ते तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय आहेत.





