बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात
पुणे : बारावीचा बोर्डाचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने सुरुवातीला घातलेल्या बहिष्काराचा तसेच संपाचा कोणताही परिणाम राज्य बोर्डाच्या निकालावर होणार नाही. दोन्ही निकाल नियोजित वेळापत्रकानुसार जाहीर केले जातील. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या संदर्भात कुठल्याही अफवा, अंदाजांवर विश्वास ठेऊ नये, असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
राज्यभरात इयत्ता बारावी आणि दहावीच्या पेपर तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. यंदा इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाल्यावर, प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बारावीचे पाच पेपर पूर्ण होऊन, तपासणीच्या कामाला सरुवातही झाली होती.