breaking-newsमनोरंजन

हैदराबाद एन्काऊंटर वर तापसी म्हणाली…

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार झाले आहेत. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पोलिसांनी बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यावर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येत असताना अभिनेत्री तापसी पन्नूने एन्काऊंटवर आश्चर्य व्यक्त केला आहे.

“आपल्या समाजातील मूळ समस्येवर आधी बोलुयात. आपल्या मुलांना आपण कशाप्रकारे घडवतो हे या सर्व गोष्टींचं सार आहे. एखादी वाईट किंवा चुकीची गोष्ट करू नये हे लहानपणापासूनच आपल्या मुलांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. भीतीमुळे नाही तर आपल्या नैतिक मुल्यांच्या विरोधात त्या गोष्टी असल्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. मी माझ्या मुलाला असंच घडवेन. आपण एखाद्यावर आरोप करू शकतो पण आपल्या मुलांना चांगल्याप्रकारे घडवणं हेच आपल्या हातात आहे. हैदराबाद एन्काऊंटरबद्दल समजल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. पोलीस इतक्या टोकाची भूमिका घेतात असं आपण कधी ऐकलं नव्हतं”, असं तापसी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’ या कार्यक्रमात ती म्हणाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button