हॅरिष पुलाचे लोर्कापण ; वाहतूक कोंडीतून चालकांची सुटका
पिंपरी – जून्या पुणे-मुंबई महामार्गावरील हॅरिष पुलावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्या पुलाला समांतर पुल बांधण्यात आला. त्यानूसार पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणारा पूलाचे आज (सोमवार) उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप याचे हस्ते करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी मदत होणार आहे.
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका आशा शेंडगे, स्वाती काटे, माजी नगरसेवक विजय लांडे, प्रभाग समितीचे नामनिर्देशीत सदस्य अनिकेत काटे, संजय कणसे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राऊत, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, उपअभियंता विजय भोजने आदी उपस्थित होते.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहन चालकांना हॅरिष पुलावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्या पुलाजवळ तासन्ंतास वाहनचालकांना थांबावे लागत होते. अनेकांना आॅफीस जाताना आणि परत येताना वर्दळीच्या काळात सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत म्हणजे खडकी-बोपोडी दोन्ही बाजूने वाहने अडकून पडत होती. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या खर्चातून हॅरिष पुलाला समांतर पुल बांधण्यास मान्यता दिली होती. त्यानूसार पिंपरीकडून पुण्याकडे जाणा-या पुलाचे काम पुर्ण झाले आहे. तसेच पुण्याकडून पिंपरीकडे येणा-या पुलाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. परंतू, काम पुर्ण झालेल्या पुलाचे लोर्कापण आमदार लक्ष्मण जगताप यांचे हस्ते करण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणा-या वाहनचालकांची सुटका होणार आहे.