हाथरस बलात्कार प्रकरण : पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो – यशोमती ठाकुर
अमरावती | हाथसर बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करन्याचा प्रयत्न तेथिल राज्य सरकार च्या वतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटूंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो त्या मुळे या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या राज्याकडे सोपवावा अशी मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
हाथरस बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश वर देशभरातून टीका होत आहे. पिडित कुटूंबाला माहीती न देता त्या तरुणीचा मृतदेह जाळण्यात आला होता. त्यानंतर हाथरसच्या जिल्हाधिकारी यांनी पीडित कुटूंबाला धक्कावल्याचा व्हिडिओ ही समोर आला होता. तसेच माध्यमासोबत बोलन्यास या कुटूंबाला पोलिसांनी नकार दिला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार ला नेमकं काय लपवायच असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हाथरस मध्ये जे काही घडलं ते अतिशय वेदनादायी घडलं. हे सर्व मानवजातीला लज्जास्पद गोस्ट आहे. हा खटला उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवला गेला पाहिजे सुप्रिम कोर्टाने राजधर्माचे पालन केले पाहिजे. या प्रकरनातील पुरावे नष्ट होण्याची श्यक्यता आहे. त्या पीडितेच कुटूंब जिवंत राहल पाहिजे असही यशोमती ठाकूर म्हणाल्या.