सर्वधर्मीय बांधवांनी राष्ट्रसेवेला प्राधान्य दिले, यासाठी सर्वांचे आभार मानतो – मुख्यमंत्री
मुंबई | राज्यात कोरोनाचा वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान राज्यात सध्या 3 मेपर्यंतचा लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमके काय बोलणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
देव हा आता मंदिरात नाही तर संयमात आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, सफारी कर्मचारी आणि यामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांमध्ये देव आहे. सर्व कोरोना योद्धांचा आदर करा. ते खूप तणावाखाली काम करत आहेत. तसेच कोरोनामुळे २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. शहीद पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. तसेच रूग्णसंख्येचा गुणाकार आपण रोखला आहे. कोरोनाचं हे संकट कुणालाच अपेक्षित नव्हतं. कोरोनाच्या लढाईत सर्वजण जात-पात, धर्म बाजूला ठेऊन एकत्र आहेत, तसंच राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे, सहकार्य करावे, असे आवाहन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींचे आभार मानले.