breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
शेती विधेयकास महाराष्ट्रात विरोध, तर भारत बंदला मोठा प्रतिसाद
मुंबई: शेती विधेयकास महाराष्ट्रात विरोध, भारत बंदला मोठा प्रतिसाद केंद्राच्या शेती विधेयक विरोधात महाराष्ट्रात चांगलेच वातावरण तापलेले आहे. या विधेयकाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत बंद’ ला महाराष्ट्रात शेतकरी संघटना आणि सत्ताधारी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय किसान सभा (आयकेएस), स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतरही घटक मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले होते. आयकेएस अध्यक्ष अशोक नवले यांच्या नेतृत्वाखाली पालघर, मुंबई येथे महेंद्र उगडे, ठाण्यात सुनील खरपत, बीडमध्ये सुभाष ढाके, जालना- गविंद अरदाद, नंदुरबार येथे सुदाम ठाकरे, नांदेडमध्ये अर्जुन अडे, कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी अशा विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आंदोलन झालेले आहे.