breaking-newsक्रिडा

विराट कोहलीदेखील माणूसच आहे – रवी शास्त्री

मुंबई: भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री कर्णधार मानेच्या त्रासामुळे कौंटी क्रिकेटमधून माघार घेणाऱ्या विराटच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. विराट एक माणूस आहे, मशीन नव्हे, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा वसूल करणाऱ्या विराटला टीम इंडियाची ‘रन मशीन’ म्हणून ओळखले जाते. मानेच्या त्रासामुळे त्याला कौंटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली. अशा कठीण काळात भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ‘मानेत चमक भरल्याने विराटने कौंटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विराट मशीन नाही. त्यात रॉकेट इंधन भरले आणि पार्कात घेऊन गेलो, असे होऊ शकत नाही. तोही एक माणूस आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी वर्तमानपत्राशी बोलताना दिली.

विराट सरे क्रिकेट क्लबचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही, हे ऐकून वाईट वाटले. विराट जखमी झाल्याने बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला कौंटी क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला. त्यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, अशी प्रतिक्रिया सरे क्रिकेट क्लबचे अध्यक्ष एलेक स्टिव्हर्ट यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button