वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही – अमृता फडणवीस
मुंबई |महाईन्यूज|
‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही; परंतू त्या नेत्याला साथ देणं ही महाराष्ट्राची चूक आहे’ असं म्हणत ट्विटचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध रंगलं असून, शह-काटशह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नसून, ट्विटरच्या माध्यमातून टीकास्त्रे सोडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पोलिसांची अॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या मुद्द्यावरून अमृता यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘सरकारनं विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत. मात्र अशा प्रकारे खाते वळवण्याचा निर्णय घेऊन सरकार मला आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहे,’ असा आरोपही अमृता यांनी केला आहे.