वांगणीजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली
मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली आहे. पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्स्प्रेस पुढे जाऊच शकलेली नाही. या एक्स्प्रेसमध्ये ७०० प्रवासी अडकले आहेत. काही वेळापूर्वीच एनडीआरएफच्या चार तुकड्या या सगळ्यांच्या सुटकेसाठी या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. एक्स्प्रेसमध्ये अडकलेले सगळे प्रवासी सुखरुप आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठीचे बचावकार्य सुरु करण्यात आल्याची माहिती कोल्हापुरात देण्यात आली आहे.
दरम्यान, वायुदलाचे हेलिकॉप्टर घटनास्थळी जाऊन पाहणी करेल अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. आपत्ती व्यवस्थापनाचं पथकही घटनास्थळी रवाना झालं आहे त्यांच्याकडूनही या ठिकाणी बचाव कार्य राबवलं जातं आहे. एक्स्प्रेसमध्ये सुमारे २ हजार प्रवासी असल्याचं NDRF ने म्हटलं आहे.
Maharashtra: A team of National Disaster Response Force arrives at the location where Mahalaxmi Express is held up between Badlapur and Wangani with approx 2000 passengers on-board.
#Maharasahtra: Railway Protection Force and City police have reached the site where Mahalaxmi Express is held up. Biscuits and water being distributed to the stranded passengers. NDRF team to reach the spot soon. https://twitter.com/ANI/status/1154938230401314819 …
ANI✔@ANI
DRM Central Railways: Mahalaxmi Express held up between Badlapur and Wangani with around 2000 passengers; National Disaster Response Force team moved for the spot #Maharashtra
पहाटे तीन वाजल्यापासून रेल्वे रुळावरच असल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही लोक दोरी आणि बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य घेऊन आले आहेत. पहाटेच्या तुलनेत आत्ता रुळांवर साठलेले पाणी सहा इंचांपर्यंत कमी झाले आहे. पाणी ओसरत असल्याने सध्या काळजी वाटत नाही मात्र पाणी वाढले एक्स्प्रेसही पुढे जाईना तेव्हा आमच्या काळजाचा ठोका चुकला होता असं रेल्वेत अडकलेला प्रवासी स्वप्निल लुगडे याने सांगितलं आहे. स्वप्निल जुना बुधवार पेठ, कोल्हापूरचा रहिवासी आहे. कोल्हापूरहून मुंबईला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस ही पुण्याजवळ थांबवण्यात आली आहे.