breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेराजकारण

Sharad Pawar । लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची: शरद पवार

सासवड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने आज देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते. नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सासवड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते मंचकावर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, ही निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक देश कोणत्या पध्दतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. आज मोदीसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. लोकांच्या सहमतीने आणि लोकशाही मार्गाने सध्या देश चालवायची गरज आहे असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणेकरांना माझा नमस्कार अशी भाषणाला सुरुवात करतील. दिल्लीत सांगतात की शरद पवार यांनी शेतकऱ्यांना मदत केली. बारामतीत येऊन म्हणतात बोट धरून आलो, असं सांगतात आणि ८ महिन्यात निवडणुकीमध्ये वेगळं भाषण करतात. भाषणात सातत्य असलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही असेही शरद पवार म्हणाले.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, पुरंदरमधील लोकांनी नेहमी साथ देतात. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात, त्याबाबत चिंता आहे. पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूक झाल्या का? लोकसभा आणि विधानसभा या निवडणुक न घेण्याची दुर्बुद्धी या सरकारला सुचू शकते. ४०० पार करण्याचा अर्थ असा आहे त्यांना वाटेल ते त्यांना करायच आहे. त्यांना संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना 400 जागा पाहिजे आहेत. नरेंद्र मोदींची धोरण काय आहेत यातून कळते, त्यामुळे अधिक या निवडणुकीत लक्ष देण्याची गरज आहे असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू. नुसती तुतारी नाही तुतारी वाजवणारा माणूस आपली खून आहे. देश योग्य दिशेला नेण्याची जबाबदारी आपली आहे. बांगलादेश सारखा देश आपल्यापेक्षा पुढे आहे. अशोक चव्हाण यंच्यावर आरोप केलं ते भाजपसोबत गेले. भोपाळमध्ये भाषण केले बँक आणि इरिगेशन मध्ये घोटाळा केला असा आरोप केला. ज्यांच्यावर आरोप केले ते आज कुठं आहेत? झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री यांना जेलमध्ये टाकलं असेही शरद पवार म्हणाले.

निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे. त्यामुळे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असून नागरिक अनेक विषयांवरती चर्चा करत आहेत. दुष्काळाचा विषय गंभीर बनला असून लोक त्याबाबत देखील बोलत आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. अनेक विषयांवर चर्चा होत आहे. लोक उत्सुक आहेत लोक दुष्काळावर देखील बोलत आहेत. या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह असून हे चिन्ह सर्वदूर पोचवण्याचं काम लोक स्वतःच करत आहेत अशा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुरंदरचे अंजीर जर्मनीत जाता त्यामुळे टॅक्स कमी झाला पाहिजे. जर तसाच चालू राहिला तर सरकारला सांगू जा काय करायचं ते करा आम्ही टॅक्स भरत नाही. चाकणला विमानतळ झालं नाही म्हणून मी विमानतळ इकडे आणल्याचे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. आम्ही जमीन घेतली नाही, तिथं जमीन कुणी घेतली हे मला माहित नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button