breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात कोरोनाचे एकूण २०७ रुग्ण, ८ जणांचा मृत्यू

मुंबई | कोरोनामुळे सगळे हादरले असतानाच मुंबईतील स्थिती काहीशी नियंत्रणात राखायला महापालिका आणि राज्य सरकारला यश आलंय. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनाचे २०७ रुग्ण असून त्यातील ८ जणांचा मृत्यू झालाय. यात मुंबईतील ८५ रुग्ण आणि ६ मृतांचा समावेश आहे.

मुंबईतील लोकसंख्या पाहता आणि इथे परदेशातून आलेल्या लोकांची संख्या पाहता मुंबईतील स्थिती सध्या तरी नियंत्रणाखाली दिसत आहे. १ मार्चपासून परदेशातून लाखो प्रवासी मुंबईत दाखल झाले. त्यातील सुमारे पावणे तीन लाख जणांची विमानतळावर तपासणी करण्यात आली. तर ३ हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. जे पॉझिटिव्ह आढळले त्यांना समाजात फिरण्याआधीच विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले, याशिवाय घरोघरी जाऊनही काही ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यामुळे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात आला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button