मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशवासियांचे साधणार सर्वांगिन हीत – अमित गोरखे
- धडाकेबाज निर्णयामुळे मोदी सरकारच्या कार्याचे कौतुक
पिंपरी / महाईन्यूज
देशातील जनतेच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. सर्व घटकातील नागरिकांना केंद्रबिंदू माणून विविध योजना जाहीर केल्या. त्यामुळे देशातील तमाम नागरिकांचे कल्याण साधले जाणार आहे. मोदींच्या कार्याबद्दल अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी योजना आणली आहे. मोदी सरकारच्या मंत्रीमंडाळाने आज या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५९ हजार रूपयांची ‘पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना’ जाहीर केली. या योजनेचा अनुसूचित जातीच्या तब्बल ४ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा ६० टक्के वाटा हा केंद्राचा असणार आहे. उर्वरीत ४० टक्के वाटा राज्य सरकारचा असणार आहे. मंत्रीमंडळाच्या या निर्णयाची माहिती केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
भारतात ‘डीटीएच’ सेवा देण्याच्या नियमांत सुधारणा करण्यास मंजूरी देण्यात आली. त्यानुसार आता ‘डीटीएच’ लायसन्स २० वर्षांसाठी लागू होणार आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘डीटीएच’ क्षेत्र १०० टक्के ‘एफडीआय’मध्ये आणण्यात आले आहे. आधी वाणिज्य मंत्रालयाने १०० टक्के परकिय गुंतवणुकीला परवानगी दिली होती. परंतु, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या गाईडलाईन्समुळे पूर्णपणे लागू करण्यात आला नाही.
मोदी सरकारने दिल्लीत बेकायदा वसाहतीत राहणाऱ्या लोकांनाही कायदेशीर संरक्षण दिले. या कायद्याचा नवा कालावधी हा ३ वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यत हा कालावधी असणार आहे, अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली.
मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. देशातील प्रत्येक घटकातील व्यक्तीचे हीत कसे साधता येईल, ही दूरदृष्टी ठेवून मोदींनी धडाकेबाज निर्णय घेतले. त्यांनी घेतलेले निर्णय जनतेचे हीत साधणारे आहेत.
अमित गोरखे, प्रदेश सचिव, भाजपा