धोका वाढणार, पण घाबरू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई | राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दुसरीडे विरोधी पक्ष असलेला भाजप आंदोलन करतोय तसेच राज्यपालांकडे तक्रारी करतोय. अशा दुहेरी आव्हानांचा मुख्यमंत्री सध्या सामना करत आहेत. या पार्श्वभुमीवर त्यांनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधला.
रस्त्यावर न उतरता घरुनच प्रार्थना करा आणि राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना करा असे आवाहन मुस्लिम बांधवाना मुख्यमंत्र्यांनी केेले. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतेय. हा विषाणु गुणाकार करत जातो. मे महिन्याच्या शेवटी सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असू शकतील असा अंदाज केंद्राच्या टीमने व्यक्त केला होता. आजच्या दिवशी राज्यात ३३ हजार ६८६ रुग्ण आहेत. १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण ३ लाख ४८ हजार २६ टेस्ट झाल्या. दुर्देवाने १५७७ मृत्यू झाले आहेत. मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलांची बालकं कोरोना निगेटीव्ह आल्याचे वृत्त ऐकून आनंद झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.