breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळ गाेळीबार प्रकरणात मी दाेषी असेन तर मला भरचाैकात फाशी द्या – अजित पवार

  • पण, आराेप करणारे दाेषी निघाले तर त्यांचीही तयारी असावी

पुणे – पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यास विराेध करणाऱ्या मावळमधील आंदोलक शेतकऱ्यांवर ९ ऑगस्ट २०११ राेजी आघाडी सरकारच्या कार्यकाळात गाेळीबार झाला हाेता. यात तीन शेतकऱ्यांचे बळी गेले. मावळमधील निवडणुकीत हा मुद्दा तापवला जात आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच हे आदेश दिले हाेते, त्यामुळे त्यांचे पुत्र पार्थ यांना पाडा, असे मेसेजही साेशल मीडियावर फिरत आहेत. मात्र या आराेपाचे अजित पवारांनी वारंवार खंडन केले आहे. ‘मावळ गाेळीबार प्रकरणात मी दाेषी असेन तर मला भरचाैकात फाशी द्या. पण आराेप करणारे दाेषी निघाले तर त्यांचीही तयारी असावी,’ असे स्पष्टीकरण त्यांनी शनिवारी राजगुरुनगरमधील सभेत दिले.

शिरुरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमाेल काेल्हे यांच्या प्रचारार्थ आयाेजित सभेत ते बाेलत हाेते. ‘डाॅ.अमाेल काेल्हे यांना निवडून दिले तर मतदारांची दाेन कामे हाेणार आहेत. एक तर तुम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आलात तर ते पण सुटणार आणि तुमचे काही दुखत असेल तर ते लगेच इंजेक्शन देऊन उपचार करणार. त्या वेळी त्यांना लगेच आठवण करून द्यायची, घड्याळाचे बटण दाबले हाेते,’ असे पवारांनी सांगताच हशा पिकला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button