मानहानीकारक मालिका पराभवानंतरही भारत रँकिंगमध्ये अव्वल
इंग्लंडविरुद्ध 4-1 असा मानहानीकारक पराभव स्वीकारूनही भारतानं आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राखलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या रँकिंगनुसार भारताचा इंग्लंडने पाचव्या व शेवटच्या कसोटीत पराभव केल्यानंतर भारताचे गुण 125 वरून घसरून 115 झाले आहेत. मात्र, दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण अफ्रिकेचे 106 गुण असल्यामुळे भारताचं अव्वल स्थान अबाधित राहिलं आहे.
With a 4-1 series win, England move up to fourth in the @MRFWorldwide ICC Test Team Rankings!
इंग्लंडने भारताचा पाचव्या व अंतिम कसोटीत 118 धावांनी पराभव केला व मालिका 4-1 अशी जिंकली. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी 464 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते, जे पेलता न आलेल्या भारताचा डाव 345 धावांवर आटोपला. मालिका पराजयानंतरही कसोटी मालिका कशी झाली हे आपण बघितलं असून भारताला प्रचंड बदल करण्याची गरज नसल्याचे मत कप्तान विराट कोहलीनं व्यक्त केलं आहे.