breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मराठा आरक्षण टिकवण्यात सरकारचे प्रयत्न कमी : संभाजीराजे
उस्मानाबाद | मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात सरकारचे प्रयत्न कमी असल्याचा आरोप भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारकडून फार प्रयत्न होताना दिसत नाहीत. सरकारमध्ये समन्वय नाही, असंही ते म्हणाले. तसंच राज्यातली आंदोलने भाजपा पुरस्कृत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या आंदोलनाला संभाजीराजेंनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते.
“मराठा आणि ओबीसी समाजात जाणीवपूर्वक दुही निर्माण केली जात आहे. मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणातून आरक्षण नको, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.