breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंत लोकांची समिती स्थापन करा
नांदेड – मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंत लोकांची समिती स्थापन करा, असं म्हणत संभाजीराजेंनी काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर टीका केली. माझा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही, तर माझा लढा संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे. न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. ते नांदेडमध्ये बोलत होते. शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. केवळ मराठ्यांना दिलं नाही. त्यावेळच्या बहुजनांमध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का?, असा सवाल संभाजीराजे यांनी सरकारला केलाय.