‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांची आशिया चषकाचं आयोजन रद्द ची घोषणा
नवी दिल्ली : यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीच्या एक दिवस आधी ही घोषणा करण्यात आली. तर ‘आयपीएल 2020’ भारताच आयोजित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले.
“भारताची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका कधी असेल, हे इतक्यात सांगणे कठीण आहे. आम्ही तयारी केली आहे, पण सरकारच्या नियमांबद्दल काहीही करु शकत नाही. आम्हाला कोणतीही घाई नाही. खेळाडूंचे आरोग्य हे आमचे पहिले प्राधान्य आहे. आम्ही प्रत्येक महिन्याला परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत” असे सौरव गांगुली यांनी सांगितले.
यावर्षी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (पीसीबी) आशिया चषकाच्या यजमानपदाची जबाबदारी होती, परंतु भारताने पाकमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.