breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसांना सांगितलं पत्नीचा मृत्यू झाला पण खरं कारण…

अमरावती | पती आणि पत्नीचं नातं विश्वासावर अवलंबून असतं. या नात्यात संशय निर्माण झाला तर हे अतूट नातं कोणतं वळण घेईल याची कल्पना सुद्धा करता येत नाही. असाच प्रकार अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावनेर येथे घडला आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

नांदगावखंडेश्वर तालुक्यातील सावनेर इथं राहणारे देवानंद बुराडे आणि संगीता बुराडे यांचा सुखी संसार सुरू होता. या दाम्पत्याला नऊ आणि सहा वर्षांची दोन मुलं आहे. देवानंद हा गावाजवळील एका पोल्ट्री फार्मवर मजुरी करतो. सुखी सुरू असलेल्या त्यांच्या संसाराला अचानक भयंकर वळण आले. देवानंद याच्या डोक्यात संशयाचे भुताने घर केलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देवानंद आणि त्याच्या पत्नीमध्ये खटके उडत होते.

दोन दिवसांपूर्वी देवानंद व पत्नी संगीता यांच्या वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. रागाच्या भरात देवानंद याने पत्नीचा गळा दाबून खून केला. रागाच्या भरात आपल्या हातून काय घडले याची जाणीव झाल्यावर देवानंद भानावर आला. त्यानंतर त्याने रात्रभर पत्नीचा मृतदेह घरातच ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घरात पत्नी मृतअवस्थेत आढळून आली, अशी तक्रार नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असता सुरुवातील देवानंद आणि त्याच्या शेजारील नातेवाईकांनी कमालीचे मौन बाळगले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button