पुलवामा चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश
जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आलं आहे. आतापर्यंत सुरक्षा दलानं २१ दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
सैनिकांनी २ दहशतवादी आणि त्याच्या १ सहकाऱ्याला कंठस्नान घातलं आहे. काही दहशतवादी अजूनही लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारीपासून ते आतापर्यंत सुरक्षा दलानं ५० दहशतवाद्यांना ठार केलं आहे. याच आठवड्यात बुधवारी देखील शोपियां जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली. बुधवारी सुरक्षादलानं एकूण चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.
तर मंगळवारी शोपियांमध्ये पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना जवानांनी अटक केली होती. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला होता.