breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
पाकिस्तानकडून 3800 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानी सैन्याने चालू वर्षात तब्बल 3800 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेलगत गोळीबार केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
श्रीवास्तव म्हणाले, दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास पाकिस्तान नेहमीच सहकार्य करत आला आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी नियंत्रण रेषेवर गोळीबार करून भारतीय सुरक्षा दलाचे लक्ष्य विचलित करण्याचे काम पाक सैन्याने केले आहे.
पाकिस्तान हा अंमली पदार्थांच्या तस्करीलाही चालना देत आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान अंमली पदार्थांबरोबरच शस्त्रास्त्रांचीही तस्करी करत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान हे दहशतवादाचे आश्रयस्थान आहे, असेही श्रीवास्तव म्हणाले.