पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘गरीब कल्याण रोजगार अभियाना’चे उद्घाटन केले…
दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते आज (20 जून) गरीब स्थलांतरित मजुरांसाठी 50 हजार कोटी रुपयांची रोजगार गॅरंटी योजनेला सुरुवात झाली आहे. ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ असं या योजनेचं नाव आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदींनी आज ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’चं उद्घाटन केलं. कार्यकुशलतेच्या आधारावरच मजुरांना कामाचं वाटप होणार आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 22 मार्च ते 31 मे पर्यंत लॉकडाऊन केला. यादरम्यान लाखो स्थलांतरित मजूर शहरांमधून आपापल्या गावाला परतले. परंतु गावात मजुरांना दोन वेळच्या अन्नासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मजुरांची ही समस्या लक्षात घेऊन ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ नावाची ही योजना सहा राज्यांवर केंद्रित राहिल, जिथे सर्वाधिक स्थलांतरित मजूर परतले आहेत.