breaking-newsराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार ‘मन की बात’मधून संवाद
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. उद्या रविवार ३०ऑगस्ट रोजी देखील ते आपल्या ‘मन की बात ‘ या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यावेळी कोणत्या विषयावर बोलणार याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या या कार्यक्रमाचा एकूण ६८ वा भाग असून मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याच्या कार्यकाळातील १५ वा भाग आहे. मागीलवेळी २६जुलै रोजीच्या ” मन की बात ‘ मध्ये त्यांनी कारगिल विजय दिन निमित्ताने शहीद जवानांच्या पराक्रमाच्या स्मृतीला उजाळा दिला होता. उद्याच्या ” मन की बात ‘ साठी त्यांनी जनतेकडून त्यांचे विचार आणि सुचना मागविल्या आहेत