न्याय जिंकला! निर्भयाच्या दोषींना फाशी झाल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
2012 च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघांना आज सकाळी फाशी देण्यात आली. मध्यरात्री पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्यासाठी एका दोषीने दाखल केलेली याचिका शेवटच्या मिनिटाची फेटाळली.
निर्भयाच्या दोषींना फासावर चढवल्यानंतर राजकीय स्थरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.
“न्याय जिंकला! महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाचे असून महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षेची काळजी घेण्याला प्राधान्य असायला हवे” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
आमच्या नारी शक्तीने प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एकत्रितपणे, आम्हाला असे राष्ट्र निर्माण करावे लागेल जेथे महिला सशक्तीकरणावर लक्ष केंद्रित केले जाईल आणि महिलांची समानता आणि संधी यावर भर दिला जाईल, असे देखील मोदी यांनी आपल्या ट्विटमधून संबोधित केले आहे.