breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर गुन्ह्याची राजधानी बनलीय, गृहमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

नागपूर |महाईन्यूज|

नागपूर गुन्ह्याची राजधानी बनली असून ही ओळख पुसण्याचे काम करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

राज्यात औरंगाबाद,अमरावती आणि नागपूर शहराची नावे गुन्हे शहरात येतात तर देशात मुंबई, पुणे आणि नागपूरचे नाव येत आहे. असे ते म्हणाले. शरद पवारांनी पत्र लिहून एसआयटीची मागणी केली. आमचा तपास सुरू आहे.अशात आम्हाला न विचारता अचानक एनआयएला तपास दिला. त्यांचे काही लोक अडचणीत येतील अशी केंद्रातील सरकारला अशी भीती आहे. म्हणून एनआयएला तपास दिला अशी शंका देशमुख यांनी व्यक्त केली. पण अशात राज्य शासन बघ्याची भूमिका घेणार नसल्याचे ते म्हणाले.

विशेष तपास पथकाकडून (SIT) कोरेगाव-भीमा प्रकरणाची सखोल चौकशी झाली असती. केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करून राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे सोपविला. ही कृती राज्यघटनेच्या विरोधात आहे. काही जणांना वाचवण्यासाठीच केंद्राने हा तपास ‘एनआयए’कडे दिल्याचा देशमुख यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button