दिल्ली पोलीस अत्यंत सक्षम, मात्र कारवाई न करण्याचे ‘वरून’ आदेश- अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली | महाईन्यूज
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात दिल्ली पोलीस अत्यंत सक्षम आहेत, मात्र त्यांना कोणतीही कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेण्यास सांगण्यात आलेले होते, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भाने केलेला आहे.
विद्यापीठांमधील हिंसाचार थांबविला नाही त्यामध्ये दिल्ली पोलिसांचा काहीही दोष नाही कारण त्यांना देण्यात आलेल्या आदेशांचे त्यांनी पालन केलेले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तुम्हाला काहीही करावयाचे नाही असे आदेश जर दिल्ली पोलिसांना देण्यात आले असतील तर दिल्ली पोलीस तरी काय करणार, असेही केजरीवाल यांनी म्हटलेले आहे. भाजपशासित दिल्ली महापालिका आणि दिल्ली सरकारच्या कारभाराची तुलना करणाऱ्या अहवालाचे केजरीवाल यांनी सादरीकरण केले तेव्हा ते बोलत होते.