थंडीत टाचांची कशी घ्यायची काळजी…
हिवाळ्यात चेहऱ्याच्या त्वचेबरोबरच पायांची विशेषत: टाचेच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. टाचांना पडणाऱ्या भेगा, काही दिवसांनी, इतक्या वाढतात की त्यातून काही गंभीर समस्या उद्भवतात.
तडे पडल्यावर टाचा दुखतात
टाचांना तडे पडल्यावर हिवाळ्यात टाचा दुखतात. पण घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास या भेगा मिटू शकतात, आणि तुमचे तळ पाय पुन्हा निरोगी आणि सुंदर होवू शकतात.
खोबरेल तेलाने मालीश
थंडी आली की त्वचा कोरडे पडायला लागते. मग शरीराला खाज सुटण, ओठांची त्वचा निघणे असे व्हायला लागते. मात्र हे नीट दिसावे यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय करतो. कधी मॉईश्चरायझर लावणे तर कधी खोबरेल तेलाने मालीश करणे असे उपाय केले जातात.
पायांच्या तळव्यांना कायम स्क्रब करा. त्यामुळे पावलांवरची धुळ निघून जाण्यास मदत होईल. पायांची त्वचाही गुळगुळीत होण्यास याचा चांगला फायदा होईल.
थंडीत रात्री झोपण्याआधी आपण चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावतो. त्याचप्रमाणे पायालाही मॉईश्चराईज करायची सवय ठेवा. त्यामुळे पायांची त्वचा मुलायम राहण्यास मदत होईल.