‘ती’ काॅफी महागात पडली, आता ग्रीन टी पितो : हार्दिक
मुंबई- क्रिकेटर हार्दिक पंड्या पहिल्यांदा कॉफी विथ करण वादावर बोलला. गेल्या वर्षी जानेवारीत प्रसारित झालेल्या शोमध्ये पंड्या आणि लोकेश राहुल आले हाेते. महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दोघांवर खूप टीका झाली होती. दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मध्येच बोलावण्यात आले होते आणि बीसीसीआयने त्यांना निलंबित देखील केले होते. दिशे कार्तिकशी सोशल मीडियावर बोलाताना पंड्याने म्हटले की, शो माझ्यासाठी खूप महाग ठरला आणि त्यानंतर मी कॉफी पिणे बंद केले. त्याने म्हटले की, ‘मी कॉफी पीत नाही. मी ग्रीन टी पितो. मी केवळ एकदा कॉफी पिली आणि ती माझ्यासाठी खूप महाग ठरली. मी पैज लावू शकतो की, स्टारबक्समध्ये इतकी महाग कॉफी नसेल. त्या घटनेनंतर मी कॉफीपासून दूर राहतो.’
हार्दिक पंड्या कोविड १९ महामारीमुळे विना प्रेक्षक आयपीएल खेळवण्यावरदेखील बोलला. त्याने म्हटले, ‘हे एक वेगळे पाऊल असेल. आम्हाला प्रेक्षकांमध्ये खेळण्याची सवय आहे. त्यांच्यामध्ये खेळताना आमच्यामध्ये रोमांच येतो. मी रणजी ट्रॉफी विना प्रेक्षकांच्या खेळली आहे आणि हे मला एक वेगळे पाऊल वाटत आहे. मी इमानदारीने सांगतो जर आयपीएल विना प्रेक्षकांच्या खेळवणे, हा चांगला पर्याय आहे. कमीत कमी लोकांचे घरी बसल्या मनोरंजन होऊ शकते.’ या अष्टपैलूसोबत त्याचा भाऊ कृणाल पंड्या देखील उपस्थित होता. तो देखील हार्दिकच्या गोष्टीशी सहमत आहे. दिनेश कार्तिकने म्हटले की, जर आयपीएल नाही झाले, तर अनेक लोकांना अडचणी येतील.