breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

… तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल; अशोक चव्हाणांचा सूचक इशारा

मुंबई | महाईन्यूज

“कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल,” असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. चव्हाण यांनी ट्वीटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाहीसदृश असल्याची टीका करताना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना येथे लक्ष्य केले. इंदिरा गांधी यांनीही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत आव्हाड यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यानंतर आव्हाड यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याची प्रतिक्रिया दिलेली होती.

देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिरा गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशा आशयाचं ट्वीट अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button