breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘जित्याची खाेड मेल्याशिवाय जात नाही’, चंद्रकांत पाटलांना पवारांचा टोला

पुणे |महाईन्यूज|

भाजपचे १०५ आमदार निवडून येऊनही त्यांना सत्ता मिळाली नाही, त्यामुळेच पाटील अशा प्रकारची वक्तव्ये सातत्याने करत असावेत. नागपूर अधिवेशनावेळी त्यांनी अशीच विधाने केली व मुख्यमंत्र्यांनी त्याचा समाचार घेतला. त्यामुळे ‘जित्याची खाेड मेल्याशिवाय जात नाही’ आणि ‘कावळ्याच्या शापाने गाय काही मरत नाही.’ ‘चाेराच्या मनात चांदणे’ अशा म्हणी वापरत करत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना अजित पवारांना टोला लगावला. तसेच त्यांनी नवीन सरकार सत्तेत येत असताना काहीही बाेलू नये. काेणतीही खाती काेणाकडे असली तरी राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री असताे आणि ताे एखाद्या मंत्र्याचा निर्णय बदलू शकताे, असेही पवार सांगितले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने बालेवाडी येथे आयाेजित क्रीडा स्पर्धाेच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारात एखादे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला गृहखाते देऊ नये कारण ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमाेरच सीसीटीव्ही कॅमेरे लावतील, असे वक्तव्य केले हाेते, त्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी काय बाेलावे हा त्यांचा अधिकार आहे. युतीचे ज्यावेळी सरकार हाेते त्याकाळी आम्ही असे वक्तव्य केले नाही. त्यांच्या मनाला वेदना हाेत आहेत की २५ वर्षांपासून त्यांच्यासाेबत असलेला शिवसेनेसारखा मित्र त्यांना साेडून गेला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button