breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘जामिया’मध्ये जे घडलं, ते जालियनवाला बाग हत्याकांडा सारखेच: मुख्यमंत्री
नागपूर – जामिया विद्यापीठात जे घडले ते जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच असल्याची संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ज्या देशात तरुण बिथरतो तो देश कधीच स्थिर राहू शकत नाही, असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. तरुणांना बिथरवू नका तेच आपल्या देशाच्या भविष्याचा आधार आहे. केंद्रानं तरुणांच्या बॉम्बची वात पेटवू नये, असे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.