breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
जनतेचा निकाल महागठबंधन तर निवडणूक आयोगाचा निकाल एनडीएच्या बाजूने लागला- तेजस्वी यादव
नवी दिल्ली: मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो आहे. हा आदेश महागठबंधनाला अनुकूल होता, परंतु निवडणूक आयोगाचा निकाल एनडीएच्या बाजूने लागलेला आहे. हे प्रथमच घडलेले नाही. 2015 मध्ये जेव्हा महागाठबंधन स्थापन झालेले तेव्हा मते आमच्या बाजूने होती पण सत्ता मिळविण्यासाठी भाजपने मागच्या दाराने प्रवेश केला होता, अशी माहिती तेजस्वी यादव (RJD) यांनी दिलेली आहे.