breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

चुकीच्या र्पाकिंगमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दोन वर्षांत १०६ जणांनी गमावला जीव


मुंबई :

 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची र्पाकिंग केली जाते. त्या वाहनाला पाठीमागून येणाºयो वाहनाची धडक होते. गेल्या दोन वर्षांत अशा अपघातांमध्ये १०६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सेव्ह लाईफ फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नुकताच र्पाकिंग केलेला ट्रक आणि पाठीमागून आलेल्या बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर सेव्ह लाईफ फाऊंडेशनने अभ्यास केला असता २०१८ आणि २०१९ या वर्षात (२२ महिन्यांमध्ये) आतापर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहने पार्क केल्यामुळे झालेल्या अपघातात १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमागील महत्त्वाचे कारणे म्हणजे, चुकीची उभी असलेली वाहने, ओव्हरटेक करण्यासाठी अत्यावश्यक लेनचा वापर, वाहनांचा वेग, चालकाच्या चुका याही आहेत.

सेव्ह लाईफ फाऊंडेशचे संस्थापक पियुष तिवारी म्हणाले की, महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांना आणि धिम्यागतीने जाणाऱ्या वाहनाला इतर वाहनाने धडक देणे हे रस्ते सुरक्षा मोहिमेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. महामार्गावर अवजड वाहने थांबविणे, वाहनचालकांचा थकवा याबाबत सध्या काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ३००० अवजड वाहन चालकांना सुरक्षित वाहने चालविण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button