breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही: शरद पवार

मुंबई: घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी उचलेन, अशी हमीसुद्धा पवारांनी सरकारला दिली आहे. सरकार एकदम निर्णय घेऊ शकते. घटना बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. म्हणून संसदेत जाऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचेही पवार यांनी सांगितले. घटनादुरुस्ती नेमकी कशी होईल, हे पवारांनी स्पष्ट करावे, असे प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये म्हणाले होते. घटनादुरुस्ती कशी होईल हे पवारांनी न सांगितल्यास केवळ मराठा समाजाला खुश करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले होते, असा त्याचा अर्थ निघेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
काल विधीमंडळात सर्वपक्षीय बैठक झाली आणि कायदेशीर अडचणी दूर करण्याचा दृष्टीने एकत्र पाऊल पुढे टाकण्याचे ठरवण्यात आले. तो निर्णय यशस्वी कसा होईल, हे पाहणे आमचे काम आहे. ते जर होऊ शकले तर हा प्रश्न सुटेल, त्या कामाला अधिक प्राधान्य देणे मला महत्त्वाचे वाटते.’ असे पवार म्हणाले.
“आम्ही आरक्षण दिले, निर्णय घेतला, हे गडकरी विसरले. महाराष्ट्रात आघाडी सरकार असताना निर्णय घेत आरक्षण दिले, लोकांना नोकऱ्या मिळाल्या. पण काही जण न्यायालयात गेले आणि निर्णयाला स्थगिती मिळाली. गडकरी हे उत्तम काम करतात याची मला कल्पना आहे आणि आनंद आहे. मात्र त्यांनी असे काही राजकीय विधान केले, तर ते अशोभनीय आहे. असे काही निर्णय महाराष्ट्रात घेतले गेले याचे स्मरण त्यांना नाहीये’ अशा शब्दांत पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही टोला लगावला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button