breaking-newsपुणेमहाराष्ट्र

खुशखबर… धरणांत पाणीसाठा वाढण्यास सुरूवात

दमदार पावसाने पाणीकपातीचे संकट टळण्याच्या मार्गावर
पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून दमदार पाऊस सुरू झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. ही वाढ मोठी नसली, तरी पाणीसाठा वाढण्यास सुरूवात झाल्याने शहरावर ओढावणारे पाणीकपातीचे संकट लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधील पाणीसाठा रविवारी (दि. 24) रोजी 2.83 वर आला होता, तो मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा 2.93 टीएमसीवर पोहचले आहे. राज्यात या वर्षी वेळे आधीच हजेरी लावलेल्या मान्सूनने जूनचे पहिले तीन आठवडे दडी मारली. त्यामुळे या चारही धरणांमधील पाणीसाठा घटण्यास सुरूवात होऊन हा पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा कमी झाला होता. त्यामुळे यावर्षी जून अखेरपर्यंत पाऊस न पडल्यास जुलै महिन्यात पाणी कपात करण्याची वेळ ओढावली होती. मात्र, शुक्रवारपासून पुनरागमन केलेल्या पावसाने शनिवार रात्रीपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे चारही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात ओढे, नाल्यांचे पाणी येण्यास सुरूवात झाली असल्याने पाणीसठ्यातही वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. ही वाढ अवघी 0.10 टीएमसी असली तरी हे पाणी शहराला चार दिवस पुरेल एवढे असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. शहराला दरदिवशी सुमारे 0.03 टीएमसी पाणी लागते.

गेल्या पाच दिवसांतील पाऊस आणि पाणीसाठा

धरणाचे नाव पाऊस पाणीसाठा
खडकवासला 84 मिमी 0.29
वरसगाव 181 मिमी. 0.00
पानशेत 174 मिमी. 2.64
टेमघर 219 मिमी 0.00

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button