breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

खंडित वीज पुरवठ्यामागे घातापाताची शक्यता आल्याची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी वर्तवली शक्यता

मुंबई । प्रतिनिधी

मुंबई व ठाणे येथे सोमवारी खंडित वीज पुरवठा होण्यामागे घातापाताची शक्यता नाकारता येत नाही. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितिन राऊत यांनी आज दिली.

कळवा पडघे 400 के व्ही वीज वहिनीत अचानक तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई व त्याच्या आजूबाजूच्या उपनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याने जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून कसुरदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे डॉ राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई शहर अंधारात जाणे ही साधीसुधी घटना नाही. यापूर्वी 2011 मध्ये अश्या प्रकारे वीज पुरवठा खंडित झाला होता. यावर एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर करून भविष्यात अश्या घटना घडू नये यासाठी काही उपाययोजना सुचविलेल्या होत्या. त्यावर अंमलबजावणी झाली किंवा नाही ये तपासून बघण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ राऊत यांनी दिली.

या घटनेची चौकशी करतांना सर्व तांत्रिक बाबी तपासून घेण्यात येणार असून वीज सुरक्षा साधनांची व उपाय योजनांचे ऑडिट करण्यात येणार आहे. लवकरच यावर अहवाल सादर करण्यात येणार आहे. काही लोक ऊर्जा खात्याला बदनाम करायचं काम करत आहे.

केंद्र सरकारने सुद्धा यावर एक समिती नेमली असून ती समिती आज भेटणार असल्याचे डॉ राऊत यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button