breaking-newsमनोरंजन
कोरोनाला हरवून घरी परतलेल्या लोकप्रिय शायरांचे ५ दिवसांनी निधन
मुंबई : लोकप्रिय शायर आनंद मोहन जुत्शी उर्फ गुलजार देहलवी यांच शुक्रवारी नोएडा येथील कैलास रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या रविवारी गुलजार हे ग्रेटर नोएडाच्या शारदा रूग्णालयातून कोरोनाशी युद्ध जिंकून घरी परतले होते.
मात्र शुक्रवारी दुपारी गुलजार देहवली यांची अचानक तब्बेत बिघडली. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना कैलास रूग्णालयात दाखल केलं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
आनंद मोहन यांचा जन्म ७ जुलै १९२६ रोजी झाला आहे. उर्दू शायरी आणि साहित्यमध्ये त्यांच मोठं योगदान आहे. गुलजार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. २००९ मध्ये त्यांना मीर तकी मीर या पुरस्काराने देखील सन्मानित केलं आहे.