breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कोरेगाव भीमा प्रकरण: महाराष्ट्र सरकारची गौतम नवलखांच्या सुटकेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई-महाराष्ट्र सरकारने मावनाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या सुटकेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने नवलखा यांच्यावरील नजरकैद उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांची ट्रांजिट रिमांड संबंधीची याचिका रद्द करत त्यांच्यावरील नजरकैद हटविण्याचा आज निर्णय घेतला होता.

या याचिकेवर तातडीने सुनवाई करावी करावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात केली आहे. भीमा-कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी करताना पुणे पोलिसांनी  28 ऑगस्टला गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वरवर राव आणि वरनॉन गोन्साल्वीस याना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ताब्यात घेतले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटक न करता त्यांना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button